केंद्र सरकारवर राकेश टिकैत यांची टीका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उस्मानाबाद : मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बँका, पेट्रोल कंपन्या, विमा कंपनी, शस्त्र कंपन्या विक्रीचा सपाटा सुरू आहे. केवळ उद्योगपती मित्राचे हित जपण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे. हे असेच चालत राहिले तर देश भांडवलदारांच्या हातात जाईल, असे मत दिल्ली किसान आंदोलनप्रमुख किसान नेते राकेश टिकैत यांनी उमरगा येथे एका परिसंवाद कार्यक्रमात बोलताना सांगितले. या परिसंवादात हरियाणा येथील शेतकरी नेते यधुविर सिंह, अॅड. उदय गवारे, तेलंगणामधील शेतकरी नेते पोटापल्ली नायडू, जितेंद्र शिंदे, विजयकुमार सोनावणे, बलभीमराव पाटील, खरोसेकर, प्राचार्य गरुड आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विनायकराव पाटील यांनी केले होते. केंद्र सरकारने कृषी विषयात आणलेले तीन काळे कायदे अन्यायकारक असून त्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या परिसंवादात बोलताना टिकैत म्हणाले, ‘‘केवळ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे लोक आंदोलनात आहेत असे म्हणणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखा प्रकार असेल. देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक दिल्ली आंदोलनात सहभागी आहेत. गेल्या दहा महिन्यांत ७५० शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झाले आहेत. तरीही हे हुकूमशाही सरकार काळे कायदे परत घेत नाही. ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही,’ असे सांगत केंद्र सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतीलच असेही ते म्हणाले.