राजीव सातव एक चैतन्यपूर्ण खासदार आणि लोकसमर्पित नेते होते : उपराष्ट्रपती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : काँग्रेस नेते- राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, " कोरोना संसर्गामुळे विकसित झालेल्या आरोग्य विषयक गुंतागुंतीमुळे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला. ते एक चैतन्यपूर्ण खासदार आणि लोकसमर्पित नेते होते. शोकाकूल परिवार आणि समर्थकांसोबत संवेदना. ओम शांती. "